दिव्यांगांसाठी समान संधी निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी : राज्यपाल मुंबई, १७ सप्टेंबर २०२६ : दिव्यांगांसाठी समान संधी निर्माण करणे ही केवळ सरकारची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. दिव्यांग व्यक्तींकडे दयेच्या किंवा सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांच्या क्षमता, प्रतिभा आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वर्मा फाउंडेशन आणि मैत्री पीस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात व्हीलचेअर वितरण शिबिर आणि राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ११ दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले, तर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३२ व्यक्तींना राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिव्यांगांकडे क्षमतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या भाषणात दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक समावेशनावर विशेष भर दिला. एखाद्या व्यक्तीमध्ये कोणती कमतरता आहे, या...
- Get link
- X
- Other Apps