ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी, पारदर्शक आणि जबाबदार करण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ सेवा आकलन (Swachh Seva Aankalan) ही नवी डिजिटल स्वयं-मूल्यांकन प्रणाली सुरू केली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी 15 सप्टेंबर 2026 रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आभासी बैठकीत या उपक्रमाचा शुभारंभ केला. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) 2.0 अंतर्गत विकसित करण्यात आलेली ही प्रणाली ग्रामपंचायत पातळीवर दरवर्षी ग्रामीण स्वच्छता सेवांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाणार आहे. ग्रामपंचायत, ग्रामसभा, ग्राम पाणी व स्वच्छता समिती (VWSC), जिल्हा आणि राज्य पातळीवरील अधिकारी या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. या माध्यमातून गावातील स्वच्छता व्यवस्था केवळ कागदोपत्री नोंदवण्याऐवजी प्रत्यक्ष परिस्थितीचे मूल्यांकन करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यातून आढळणाऱ्या त्रुटींवर सुधारणा करण्यासाठी स्थानिक पातळीवर कृती आराखडा तयार करता येणार आहे. स्वच्छ सेवा आकलन म्हणजे काय? स्वच्छ सेवा आकलन ही ग्रामपंचायत पातळीवरील वार्षिक डिजिटल स्वयं-मूल्यांकन प्रक्रिया आहे. ग्रामीण भाग...
- Get link
- X
- Other Apps