राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी वैज्ञानिक संशोधन केवळ प्रयोगशाळा आणि संशोधन पत्रिकांपुरते मर्यादित न राहता त्याचा थेट फायदा समाजाला आणि सर्वसामान्यांच्या जीवनाला झाला पाहिजे, असे आवाहन केले. विज्ञानाचा अंतिम उद्देश समाजसेवा आणि लोकांचे जीवन अधिक चांगले करणे हा असला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी (9 सप्टेंबर) मुंबईतील माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. ‘ग्रीन केमिस्ट्री आणि सस्टेनेबल इंजिनिअरिंग’ या विषयावरील या परिषदेत पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि संशोधनाचा समाजासाठी उपयोग यावर चर्चा करण्यात आली. ही परिषद ICT मुंबई आणि इंडियन केमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. एम. लक्ष्मी कांतम यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आली होती. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा विज्ञान समाजाशी जोडण्यावर भर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आपल्या भाषणात विज्ञान आणि समाज यांच्यातील अंतर कमी करण्याची गरज व्यक्त केली. प्रयोगशाळांमध्ये विकसित होणारे संशोधन प्रत्यक्ष लोकांच्या समस्या सोडवण्य...
- Get link
- X
- Other Apps