भारताचा नारळ उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती आणि लाखो कुटुंबांच्या उपजीविकेसाठी महत्त्वाचा आधार बनला आहे. देशातील सुमारे 3 कोटी नागरिक , त्यात जवळपास 1 कोटी शेतकरी , नारळ क्षेत्रावर अवलंबून आहेत. जागतिक नारळ उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर असून, मूल्यवर्धित उत्पादनांमुळे नारळाची निर्यातही वेगाने वाढत आहे. 2025-26 मध्ये देशात सुमारे 2,175 हेक्टर क्षेत्र नारळ लागवडीखाली वाढवण्यात आले , तर 1,672 हेक्टर क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले. केंद्र सरकारने 2026-27 च्या अर्थसंकल्पात नारळ क्षेत्रासाठी Coconut Promotion Scheme जाहीर केली आहे. यामुळे शाश्वत उत्पादन, निर्यात आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. भारताच्या नारळ उद्योगाची वाढती ताकद भारतात नारळाला केवळ कृषी उत्पादन म्हणून नव्हे, तर सांस्कृतिक आणि आर्थिक संपत्ती म्हणूनही विशेष महत्त्व आहे. ‘कल्पवृक्ष’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारळाच्या झाडापासून अन्न, पेय, तेल, औषधी उपयोग, तंतू, लाकूड आणि इंधन यांसह अनेक प्रकारची उत्पादने मिळतात. भारतामध्ये नारळ लागवडीचा इतिहास जवळपास 3,000 वर्षांचा असल्याचे नमूद ...
- Get link
- X
- Other Apps